अजित पवार कर्माची फळे भोगतायेत : गिरीश बापट

Girish bapat
Girish bapat

पुणे : अजित पवार यांना महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करण्याची सवय होती, पालकमंत्री असताना त्यांनी महापालिका, जिल्हा परिषद फोनवरून चालवली त्यामुळे. त्यामुळे ते आज त्यांच्या कर्माची फळे भोगत आहेत, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली. 

पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर टीका करत मी पालकमंत्री असताना पुण्याला पाणी कमी पडू दिले नाही असे सांगितले.
 
त्याबाबत विचारले असता बापट म्हणाले, ''पुण्यासाठी समान पाणी पुरवठा योजना तयार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत पाण्याचा प्रश्न सुटेल, पाईपलाईन टाकल्या जात आहेत. १०० पैकी ८३ टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. आमच्याकडे महापालिकेच्या कामात पालकमंत्री ढवळाढवळ करत नाहीत. महापौर, सभागृहनेते हे सर्वजण एकत्र बसून निर्णय घेतात. महत्वाचे विषय पालकमंत्री सरकारकडे घेऊन जातात, ही माझी कामाची पद्धत होती, चंद्रकांत पाटील ही असेच काम करत आहेत. 

''अजित पवार यांना पालिकेच्या कामात ढवळाढवळ करण्याची सवय आहे. फोनवरून महापालिका, जिल्हा परिषद चालवली. त्यांना हवे तसे निर्णय करून घेतले. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. ते आता त्यांच्या कर्माची फळे भोगत आहेत'', अशी टीका बापट यांनी केले. 

माझा कौल सगळीकडेच महत्वाचा
कसबा मतदारसंघात उमेदवार कोण असेल असे विचारले असता हे पक्षाचे नेते ठरवतील असे बापट यांनी सांगितले. पण तुम्ही पाच वेळा आमदार होता, त्यामुळे तुमचा कौल पक्ष घेणार का असे विचारताच बापट म्हणाले, माझा कौल कसब्यातच काय सगळे सगळीकडेच महत्वाचा आहे. पण मी पक्षाच्या शिस्तीत वाढलेला कार्यकर्ता आहे, सर्व गोष्टी मी बाहेर सांगणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com