

पुणे - ‘ओबीसी च्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजना मराठा समाजाला लागू करण्याची घोषणा ही सरकारची वैचारिक दिवाळखोरी आहे. ओबीसी, दलित महामंडळांना अपुरा निधी असताना दुसरीकडे मराठा समाजासाठी स्वतंत्र योजनांचा वर्षाव केला जातो. सामाजिक मागासलेपणाचा निकष बाजूला ठेवत हे सरकार मराठा समाजाला योजना देते हा ‘ओबीसी’ बाबत दुजाभाव असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.