
"Chaos at Yashwant Factory’s annual meeting — Vikas Lavande criticizes government for alleged bias."
Sakal
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : संचालक मंडळाने कारखान्याच्या खर्चातील जवळपास १०० कोटी रुपये वाचवले असून ज्या बँकांची देणे आहेत त्यांना एका वेळी हे पैसे देण्यात आलेले आहेत त्यामुळे कारखान्याची सर्व जमीन आता मोकळी झाली आहे. कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांचे सहकारी यांनी न्यायालयीन लढा लढल्यानंतरच ही संचालक मंडळ आज कार्यरत आहे. कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा विचार करता आणि यशवंत पुन्हा गतवैभवास प्राप्त व्हावा यासाठी सर्व संचालक मंडळाने गेल्या काही महिन्यांमध्ये मोठा प्रयत्न करून शासन दरबारी आपल्या भूमिका मांडून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून आपल्याला या निर्णयापर्यंत पोहचता आले असल्याचे मत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी व्यक्त केले.