पुणे : ''मराठा आरक्षणाच्या सुनावणीत घोटाळा झाला तर त्याला जबाबदार सरकार असेल, अशी प्रतिक्रिया देत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर आज टीका केली आहे. पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना ते म्हणाले, ''पाहिले आरक्षण कुणी दिले असेल तर ते शाहू महाराजांनी दिलं. त्यांचा वंशज असल्यानं मी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा दिला. पहिला आवाज मी उठवला, पहिल्यांदाच संसदेत मी आवाज उठवला, प्रश्न मांडला. मी माझं कौतुक करून घेण्यासाठी इथं आलो नाही. राज्य सरकारने आरक्षणासाठी प्रयत्न केले, मात्र त्याला स्थगिती आली पण, ती काही कायमस्वरूपी नाही.''
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
येत्या 25 जानेवारीला मराठा आरक्षणाबाबात न्यायलयात अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा समाजतील (SEBC) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) आरक्षणाचा लाभ देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा समाजातील उमेदवारांना शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी आरक्षण लागू व्हावे म्हणून EWSचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे
या पार्श्वभूमीवर EWS आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, ''EWS काही मराठ्यांच आरक्षण नव्हे, त्यात शेकडो जाती आहे. माझा EWS ला विरोध नाही, मात्र त्याचा धोका होऊ मराठा आरक्षणाला होऊ शकतो. सुपर निम्युररी हा विषय सुचवला होता. त्याबाबत नामवंत वकिलांच्या बरोबर व्हीसी ठरली होती. त्यात अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील होते. हे मी बोलणार नव्हतो, पण आज सांगतोय. सरकारचे पटवाले वकिल सल्ला देतात.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारावर टीका करताना ते पुढे म्हणाले, ''सरकार हतबल झालं आहे, त्यांनी हा निर्णय आधी का घेतला नाही? मराठा समाजाला EWS मधून किती टक्के आरक्षण मिळणार आहे याचा विचार करावा. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकांनी बलिदान दिलं ते व्यर्थ जाणार आहे का? असा प्रश्न विचारत त्याचं उत्तर सरकारने द्यावे अशी त्यांनी मागणी केली.
कडाक्याच्या थंडीतही आंदोलनाची धग कायम; पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच!
''मराठा आरक्षणाच्या सुनावणीत गडबड वाटायला लागली आहे, त्यास काही झालं तर सरकार जबाबदार राहणार. त्याच्या पुढे मी लढा देईल, सकल मराठा समाजाने सांगावं ती भूमिका मी घेईल. अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी यावेळी घेतली. तसेच ते पुढे म्हणाले ,''EWS चा निर्णय घेऊन आरक्षणाला धक्का लागणार नाही याची हमी द्यावी, सरकारने ही पळवाट शोधली आहे.''
तारादूतांच्या सारथी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलाबाबत बोलताना ते म्हणाले, ''मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सारथीची सगळी माहिती दिली आहे. राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा वाढदिवसाच्या दिवशी बोललो. शाहू महाराजांचे पवार साहेब पाईक आहेत, त्यांनी ते सांभाळलं पाहिजे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.