हापूसची वाटचाल अंतिम टप्प्याकडे

Hapus-Mango
Hapus-Mango

भावात घसरण; रत्नागिरी, कर्नाटकच्या आंब्याला अधिक पसंती
पुणे - फळबाजारात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार सुरू असलेला रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी पंधरा दिवस हा हंगाम सुरू राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मार्केट यार्डमधील फळबाजारात रत्नागिरी हापूसची आवक तीन ते साडेतीन हजारपेटी इतकी झाली होती. यापूर्वी ही आवक दुप्पट होत होती. आणखी आठ दिवसांनतर आवक आणखी कमी होईल, असा अंदाज रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे आणि कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहण उरसळ यांनी व्यक्त केला.

यंदा वातावरणातील बदलांमुळे रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकातील हापूसच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. आंब्याच्या उत्पादनात तब्बल ५० टक्‍क्‍यांनी घट झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागल्याचे मोरे यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकातील आंब्याची आवक सुरू झाली. दरम्यान, तापमानातील बदल तसेच अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे कर्नाटकातील आंब्याच्या प्रतवारीवर काहीसा परिणाम झाला. सद्यःस्थितीत कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, एक जूनपासून आवक कमी कमी होत राहील, असे उरसळ यांनी सांगितले. कर्नाटक हापूसची १४ ते १६ हजार पेटी आणि अडीच ते तीन हजार क्रेट इतकी आवक झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com