पुणे - गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली..पश्चिम महाराष्ट्रातील चासकमान, वरसगाव, पवना, कासारसाई, मुळशी, राधानगरी, वारणा, दारणा, वालदेवी व वाकी अशा अनेक धरणांतील पाणीपातळीत वाढ होत असून हळूहळू विसर्गामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गनगरी, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी-वाऱ्यांसह पाऊस सुरू असून, समुद्राच्या मोठ्या लाटा किनाऱ्यांवर धडकत आहे. हवामान विभागाने ४.८ मीटर उंचीच्या लाटांचा इशारा दिल्याने प्रशासनाकडून मच्छीमारांना दक्षतेचा इशारा दिला आहे..धरणातून विसर्गमध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. दारणा धरणातून सर्वाधिक ५,१९८ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने, पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग ३२२० क्युसेकने वाढवून तो १० हजार २६० क्युसेक इतका केला आहे..सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने उचलून १६,५६५ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या धरणातच्या पायथा व दरवाज्यातून एकूण १८,६६५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.