सरकारबाबतचा निर्णय हे घेतील!

valse patil
valse patil

राज्यातील परिस्थितीवर दिलीप वळसे पाटील यांचे भाष्य

नारायणगाव (पुणे) : ""सरकार बनेल, कधी बनेल, काय बनेल हे हायकमांड ठरवतील. हायकमांड हे कधीच दिसत नसते. मात्र ते योग्य निर्णय घेतील. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाबाबत योग्य तो निर्णय घेतील. आपल्याला जे पात्र वठवायला सांगितले आहे, ते वठवायचे. आपला रोल संपला की विंगेत निघून जायचे. राजकारणात बऱ्याच गोष्टी घडत असतात, रोज परिस्थिती बदलत असते. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत मंत्रिमंडळासंदर्भात विनाकारण चर्चा करू नका,'' असा सल्ला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी वळसे पाटील बोलत होते.

ते म्हणाले, ""सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे राजकीय व्यक्ती टेन्शनमध्ये आहेत. मात्र, टेन्शन न घेणारा एकच माणूस म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वजण सोडून निघाले असताना पवारसाहेबांनी टेन्शन घेतले नाही. राज्याचा झंझावाती दौरा करून त्यांनी राजकीय परिस्थिती बदलून टाकली. अबालवृद्ध पवारसाहेबांवर प्रेम करतात; मात्र तरुणवर्गही त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. आगामी काळात तरुणांचे रोजगाराचे व शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवायचे आहेत. डॉ. कोल्हे यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघाला कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, बुद्धिमान व प्रभावी वक्ता असलेला खासदार लाभला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाच आमदार व खासदार डॉ. कोल्हे यांच्या माध्यमातून या भागातील प्रश्‍न मार्गी लागतील.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com