Pune News : पत्नीने माहेरी थांबायचे की सासरी जायचे यावर १५ वर्षांनी निघाला तोडगा

लग्न झाल्यानंतर आपल्या एकुलत्या एका मुलीने आपल्याबरोबरच राहावे, अशी मुलीच्या वडिलांची इच्छा होती. तर मी घरजावर्इ होणार नाही, अशी भूमिका जावयाने घेतली होती.
 Court Order
Court Order esakal

पुणे - लग्न झाल्यानंतर आपल्या एकुलत्या एका मुलीने आपल्याबरोबरच राहावे, अशी मुलीच्या वडिलांची इच्छा होती. तर मी घरजावर्इ होणार नाही, अशी भूमिका जावयाने घेतली होती. त्यामुळे माहेरी थांबायचे की सासरी जायचे हा वाद. तसेच दोघांमध्ये असलेल्या मतभेदामुळे सुरू असलेल्या वादावर १५ वर्षांनंतर समुपदेशनातून तोडगा निघाला आहे.

मतभेद असलेले हे जोडपे आणि दोघांची आर्इ असे चौघे आता कोल्हापूरला एकत्र राहत आहेत. पतीने पत्नीच्या आर्इ-वडिलांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक (वय ५५) आणि रूपाली (वय ४९) (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव. अशोक हे व्यावसायिक आहेत तर रूपाली गृहिणी. रूपाली या एकुलत्या एक अपत्य. २००६ मध्ये त्यांचा अशोक यांच्याशी विवाह झाला.

लग्नानंतर माहेरी राहायचे की सासरी जायचे हा वाद आणि स्वभावातील मतभेदामुळे ते २००८ पासून विभक्त राहत आहेत. लग्नानंतर मुलीने आपल्याकडेच कोल्हापूर येथे जावयासह राहावे, असे रूपाली यांच्या वडिलांना वाटायचे. तर अशोक यांना घरजावई होणे मान्य नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये कुणाचे ऐकावे, अशा प्रश्न रूपाली यांना पडला होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत. २०१५ साली दोघे एकत्र आले.

त्या खुशीत पतीने पत्नीला सोन्याचा हार केला. मात्र पाच ते सहा महिन्यांनी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यामुळे ते पुन्हा विभक्त राहू लागले. दरम्यान रूपाली यांच्या वडीलांचे निधन झाले. सततच्या वादामुळे अशोक यांनी पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला व ते ॲड. राहुल जाधव यांच्याकडे समुपदेशनासाठी गेले.

दोघांचा एकमेकांवर विश्‍वास आणि प्रेम असल्याचे ॲड. जाधव यांच्या लक्षात आले. दोघांच्या चुका ॲड. जाधव यांनी त्यांना लक्षात आणून दिल्या. त्यानंतर अशोक यांनी सासूला सांभाळायचे मान्य केले. त्यामुळे तिची आई, त्याची आई आणि जोडपे आता एकत्र राहत आहेत.

लग्नानंतर आर्इ-वडिलांना सांभाळण्यावरून दांपत्यात वाद होणार नाहीत, याबाबत पती-पत्नीचे वेळेत समुपदेशन झाले पाहिजे. तसेच मुलगी जर एकुलती एक असेल तर आयुष्याच्या शेवटी तिच्या आई-वडिलांची हेळसांड होणार नाही, याची काळजी मुलगी आणि जावयाने घेणे आवश्यक आहे. दोघांनी मिळून यावर योग्य तो निर्णय घेतल्यास त्यांच्यात वाद होणार नाहीत.

- ॲड. राहुल जाधव, दांपत्याचे वकील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com