वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न - प्रा. तेज निवळीकर

भोसरी - बंधुता पुरस्कार वितरणप्रसंगी (डावीकडून) प्रकाश जवळकर, प्रकाश रोकडे, प्रा. वसंत सपकाळ, प्रा. तेज निवळीकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अशोककुमार पगारिया, बबन भेगडे व डॉ. अशोक शिंदे.
भोसरी - बंधुता पुरस्कार वितरणप्रसंगी (डावीकडून) प्रकाश जवळकर, प्रकाश रोकडे, प्रा. वसंत सपकाळ, प्रा. तेज निवळीकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अशोककुमार पगारिया, बबन भेगडे व डॉ. अशोक शिंदे.

पिंपरी - ‘संत गाडगेबाबा हे कृतिशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार व आचारात एकवाक्‍यता होती. परिसराच्या स्वच्छतेबरोबरच समाजमनाची स्वच्छता व्हावी, हे त्यांचे स्वप्न होते,’’ असे मत व्याख्याते प्रा. तेज निवळीकर यांनी केले. 

भोसरीतील प्रीतम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेतच्या समारोपप्रसंगी प्रा. निवळीकर बोलत होते. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. ललिता सबनीस, मुख्य संयोजक डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, व्याख्याते प्रा. निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’, तर पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. 

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘संविधानाचा विचार सगळीकडे पोचविण्यासाठी बंधुता हे मूल्य अतिशय आवश्‍यक आहे. आर्थिक श्रीमंतीपेक्षाही वैचारिक श्रीमंती अधिक महत्त्वाची असते.’’ एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया यांची निवड करण्यात आली. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. 

‘अनुभवातील साहित्य कसदार’
‘‘अनुभवातून लिहिलेले साहित्य कसदार असते. स्त्रियांनी आपल्या अनुभवांवर आधारित साहित्य निर्माण केले पाहिजे. बाईचा माणूस म्हणून विचार होण्यासह त्यांना मुक्तपणे लिहिता आले पाहिजे. मात्र, आज बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने आहेत. स्त्रियांनी भाषेवरील ही पुरुषी बंधने झुगारून कसदार साहित्य निर्मिती केली पाहिजे,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्‍विनी धोंगडे यांनी व्यक्त केले. 

‘स्त्रीवादी साहित्य : काल, आज उद्या’ विषयावरील व्याख्यात डॉ. धोंगडे बोलत होत्या. या वेळी आकांक्षा प्रतिष्ठानच्या संचालिका राणी चौरे व माजी महापौर मोहिनी लांडे यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’, तर शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रा. बाजीराव गायकवाड व कलांगण कला संस्थेचे सचिन घटने यांना ‘राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com