इंदापूर : महात्मा फुलेनगर (बिजवडी ता.इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम सन २०२१ -२२ मध्ये मंगळवारी दि.७ डिसेंबर अखेर २ लाख ११ हजार ६५० मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे.या हंगामात कारखाना निश्चित १२ लाख मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण करेल अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
श्री. पाटील पुढे म्हणाले, कारखान्याचा चालू गळीत हंगाम प्रगतीपथावर असून रोज सरासरी ८ हजार मे. टन गाळप क्षमतेने ऊसाचे गाळप होत आहे. कारखान्याचे सह वीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी सर्व उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प सध्या पुर्ण क्षमतेने चालु आहेत. कारखान्याने चालू हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास प्रति टन रु. २५०० पेक्षा अधिकचा दर जाहीर केला असून शेतकऱ्यांना पहिला हप्ता प्रति टन रु. २१०० प्रमाणे नियमितपणे दिला जात आहे. कारखान्याने ऊस गाळपाचा २ लाख मे. टनाचा टप्पा यशस्वी पार केल्याबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, शारदा पवार, कांचन कदम, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, कार्यकारी संचालक देवराव लोकरे व अधिकारी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.