
पुणे : महाराष्ट्राची ३० जिल्हे रेड आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत, अशा स्थितीत राज्यात महाविद्यालयीन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ऑनलाईन परीक्षेसाठी पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे परीक्षा न घेता पूर्वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारीत आताचे निकाल जाहीर करावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासू) राज्य सरकारच्या समितीकडे केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर राज्याच्या समितीचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थी संघटनांकडून त्यांची मते व सूचना मागविल्या होत्या. त्यामध्ये ही मागणी केली आहे.
- लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांना घरपोच मिळणार डिझेल; पुणे जिल्हा परिषदेचा 'डिझेल टू होम' उपक्रम!
'मासू'ने 'यूजीसी'ला परीक्षे घेण्यासाठी पर्याय सुचविले होते. त्याची दखल घेतली आहे. 'यूजीसी'च्या मार्गदर्शक सूचनामध्ये मुद्दा क्रमांक ५ आणि ६ मध्ये इंटरनस गुणवत्ता तपासणी किंवा यापूर्वीच्या सत्रात किंवा वार्षिक गेल्या वर्षीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून निकाल लावावा असे नमूद केले आहे. त्याचा विचार राज्य सरकारच्या समितीने करावा अशी मागणी मासुचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १४ जिल्हे रेड झोन तर १६ जिल्हे ऑरेंज झोन आहेत. तर ६ जिल्हे ग्रीन झोन आहेत.
३० जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव असताना ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेऊ नये. यात विद्यापीठांसह विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामोरे जावे लागेल, जर परीक्षा घेण्याचा अट्टहास असेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सिद्धार्थ तेजाळे आणि दादाराव नांगरे यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.