

MP Jyoti Waghmare attacks Sanjay Raut over his controversial remarks in Pune
Sakal
पुणे : संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वैचारिक दिवाळखोरी दिसून येत असून, त्यांच्या भाषेमुळेच पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याचा दावा शिवसेना पक्षाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी पुण्यात शनिवारी केला. खोक्यांमुळे नाही, तर धोक्यामुळे लोक पक्ष सोडून गेले असे म्हणत राऊत हे आता ठाकरे गटाचे नव्हे, तर काँग्रेसचे सुपारीबाज प्रवक्ते झाल्याचा आरोपही त्यांनी केला.