Chakan News : आधी परतावा द्या आणि मग कामे सुरू करा; चाकण एमआयडीसी मधील गोनवडीतील शेतकऱ्यांचा एल्गार

जोपर्यंत आम्हाला जमिनीचा १५ टक्के विकसित परतावा मिळत नाही,घर आणि झाडांचे चालू बाजारभावानुसार मूल्यांकन होत नाही आणि घरांचे परतावे मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांचे काम सुरू करू देणार नाही असा इशारा चाकण औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी गोनवडी (ता.खेड) येथे दिला आहे.
Chakan News : आधी परतावा द्या आणि मग कामे सुरू करा; चाकण एमआयडीसी मधील गोनवडीतील शेतकऱ्यांचा एल्गार
Chakan News : आधी परतावा द्या आणि मग कामे सुरू करा; चाकण एमआयडीसी मधील गोनवडीतील शेतकऱ्यांचा एल्गारSakal

आंबेठाण : जोपर्यंत आम्हाला जमिनीचा १५ टक्के विकसित परतावा मिळत नाही,घर आणि झाडांचे चालू बाजारभावानुसार मूल्यांकन होत नाही आणि घरांचे परतावे मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांचे काम सुरू करू देणार नाही असा इशारा चाकण औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी गोनवडी (ता.खेड) येथे दिला आहे.

चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचमध्ये ज्या कंपन्यांना एमआयडीसीकडून भूखंड वाटप करण्यात आले आहेत त्यात काम सुरू करण्यासाठी कंपनीचे लोक आले असता त्यांना स्थानिक नागरिकांनी रोखले आणि आपल्या भावना मांडल्या.

आमच्या भागाचा विकास होईल आणि आमच्या पोराबाळांना नोकऱ्या,कामधंदा मिळेल म्हणून आम्ही जमिनी दिल्या.परंतु मागील तीन वर्षांपासून आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत असाही आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला.

याप्रसंगी संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिनेश मोहिते,बाळासाहेब मोहिते,तबाजी मोहिते,बबन मोहिते,धनंजय तनपुरे,दशरथ काळे,संजय शेजवळ, रामदास काळे,दत्तात्रय मोहिते,संतोष मोहिते,संदीप मोहिते,किरण मोहिते,दीपक मोहिते,योगेश काळे,मंगेश काळे आदी शेतकरी उपस्थित होते.

जो १५ टक्के परतावा मिळणार आहे तो सुविधांसह विकसित करून मिळावा.ज्यांची घरे,शेतातील झाडे, जलवाहिनी संपादित जागेत गेल्या आहेत त्यांचे चालू बाजारभावानुसार मूल्यांकन करावे आणि बाधित शेतकऱ्यांना घरांचे परतावे अजून मिळाले नाही ते तात्काळ मिळावेत असे सांगत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

दिनेश मोहिते पाटील ( संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना,शेतकरी ) - ज्यांच्या जमिनी एमआयडीसीत गेल्या त्यांना परतावे वाटप नाही परंतु भांडवलदार लोकांना तात्काळ आणि मोक्याच्या ठिकाणी परतावे वाटप केले आहेत.

काही शेतकऱ्यांना पेमेंट वाटप करून तीन वर्षे लोटली तरीही परतावे वाटप केले जात नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना परतावे वाटप,चालू बाजारभावानुसार संपादित जागांचे आणि वास्तूंचे मूल्यांकन केले जात नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com