चष्मा घालविण्यावर लेझरचा उपाय

कोथरूड - ‘सकाळ आरोग्य’ प्रस्तुत ‘लॅसिक लेझर उपचार सेमिनार’मध्ये बोलताना नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर. या वेळी (डावीकडून) अरुणा केळकर,  सुधीर गाडगीळ, डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. जाई केळकर.
कोथरूड - ‘सकाळ आरोग्य’ प्रस्तुत ‘लॅसिक लेझर उपचार सेमिनार’मध्ये बोलताना नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर. या वेळी (डावीकडून) अरुणा केळकर, सुधीर गाडगीळ, डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. जाई केळकर.

पुणे - ‘चष्मा लागण्याला आनुवंशिकता हेच प्रमुख कारण आहे. हिरव्या पालेभाज्या, गाजर खाऊन चष्मा जात नाही. त्यासाठी योग्यवेळी डोळ्यांवर लेझर करून चष्मा घालविता येतो,’’ असा विश्‍वास राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतील (एनआयओ) नेत्रतज्ज्ञांनी रविवारी व्यक्त केला.

‘सकाळ आरोग्य’ प्रस्तुत ‘लॅसिक लेझर उपचार’ सेमिनारमध्ये नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. आदित्य केळकर, डॉ. जाई केळकर, डॉ. वसुंधरा संत, डॉ. सुवर्णा जोशी, डॉ. पंकज बेंडाळे आणि डॉ. योगेश चौगुले यांनी मार्गदर्शन केले. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सर्वांशी संवाद साधला. ‘‘आमच्या डोळ्यांबद्दलच्या सर्व शंकांना समाधानकारक उत्तर मिळाले,’’ अशा शब्दांत श्रोत्यांनी भावना व्यक्त केली.

डॉ. आदित्य केळकर म्हणाले, ‘‘चष्मा घालविण्यासाठी लेझर सर्वांत सुरक्षित पद्धत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे रुग्णाचा चष्मा अधिक प्रभावीपणे घालविता येतो. त्यातून लेझरचा दुष्परिणामही कमी करण्यात वैद्यकशास्त्राला यश आले आहे. लहानपणी चष्म्याचा नंबर सतत बदलतो. नंबर स्थिर झाल्यानंतर म्हणजे वयाच्या १८ वर्षांनंतर लेझर शस्त्रक्रिया यशस्वी होते.’’

डॉ. जाई केळकर म्हणाल्या, ‘‘मधुमेहाप्रमाणेच चष्मादेखील आनुवंशिक आहे. आई-वडिलांना चष्मा असेल तर मुलांना चष्मा लागण्याची शक्‍यता खूप असते. चष्मा म्हणजे काही अपंगत्व नाही. तो घालवायचा असेल तर लेझर करावे लागते. टीव्ही, मोबाईलमुळे चष्मा लागतो असे, नसून तो लहान वयात जास्त वापरल्यास नंबर वाढू शकतो. अद्ययावत लेन्स वापरल्यास चष्म्याची गरज कमी होते.’’

डॉ. जोशी म्हणाल्या, ‘लेझरपूर्वी डोळ्याची पूर्ण तपासणी केली जाते. त्यात बुब्बुळाशी संबंधित जास्त तपासण्यात असतात.’’ अरुणा केळकर यांनी स्वागत केले.

डोळ्यातील नैसर्गिक लेन्समध्ये निर्माण झालेल्या दोषाला मोतीबिंदू म्हणतात. भारतीयांचे आयुर्मान वाढल्याने डोळ्यातील लेन्सची कार्यक्षमता कमी होते. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर चष्मा वापरावा लागतो. शस्त्रक्रिया करतानाच अद्ययावत लेन्स वापरल्यास चष्मा वापरावा लागत नाही.
- डॉ. श्रीकांत केळकर, नेत्रतज्ज्ञ, एनआयओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com