वकिलच आले सध्या टेन्शनमध्ये; पण त्यांनी शोधले पर्याय

Lawyer
Lawyer

पुणे - समाजातील विविध घटकांमध्ये अनेक कारणांवरून होणारे वाद-विवाद आणि त्यातून न्यायालयात जाणारे प्रकरण मिटवून अनेकांचे टेन्शन कमी करणारे वकिलच सध्या टेन्शनमध्ये आले आहेत. कोरोनाच्या या परिस्थितीत झालेल्या आर्थिक व इतर बाबींच्या नुकसानीतून आपले मनोबल वाढावे तसेच नैराश्य झटकून पुन्हा जोरदार प्रॅक्टिस करण्यासाठी ऊर्जा मिळाली यासाठी अनेक वकील मंडळी सध्या ट्रेस मॅनेजमेंटचे धडे गिरवत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे वकिलीवर देखील कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. सुमारे तीन महिने न्यायालये बंद होती. सध्या ती सुरू झाली असली तरी त्यात तात्काळ प्रकरणांवर सुनावणी होत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या जवळपास 90 टक्के खटल्यांची कामे थांबलेली आहेत. खटल्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू नसल्याने पक्षकारांकडून वकिलांना मिळणारी फी पूर्णतः थांबली आहे. त्यामुळे वकीलवर्ग देखील हैराण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वकिलांचे मानसिक आरोग्य सक्षम व्हावे व त्यांच्या मनातील नैराश्‍य दूर व्हावे यासाठी वकील संघटनांकडून ट्रेस मॅनेजमेंटबाबत वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत.

ट्रेस मॅनेजमेंटचे धडे देणारे ऍड. इब्राहिम शेख यांनी याबाबत सांगितले की, “ सध्या न्यायालयात केवळ तात्काळ प्रकरणांची सुनावणी होत आहे. त्यामुळे जामीन करून देणाऱ्या वकिलांना सध्या काही कामे आहेत. मात्र जे वकील खटले चालवतात किंवा दिवाणी न्यायालयाचे प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची कामे जवळपास 90 टक्के थांबलेली आहे. त्यामुळे वकीलवर्ग देखील अडचणीत आला आहे. आता आपले पुढे काय होणार याची चिंता ते करू लागले आहेत. मात्र या सर्वांनी कोणत्याही बाबीचे टेन्शन न घेता मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे."

चांगल्या गोष्टी अंमलात आणा -
वकील सर्व चांगल्या गोष्टी नेहमी ऐकत असतात. मात्र त्या आपल्या आयुष्यात लागू करत नाही. मानसिक किंवा शारीरिक आरोग्यासाठी पूरक असलेल्या चांगल्या गोष्टी जोपर्यत ते लागू करणार नाहीत तोपर्यंत त्यांचा फायदा होणार नाही. सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी वकिलांनी आता ठेवावी. हेही दिवस जातील, असा सल्ला ऍड. शेख यांनी दिला. 

रोग प्रतिकार वाढवण्यासाठी वकिलांनी काय करावे, याबाबत आम्ही काही वेबिनार घेतले होते. सध्याच्या परिस्थितीमुळे वकिलांवर आलेले दडपण दूर करण्यासाठी त्यामाध्यमातून प्रयत्न करण्यात आले. वकिलांचे आयुष्य हे खूप धावपळीचे असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांनी स्वतःला वेळ देऊन अधिक सुदृढ बनावे, असे मार्गदर्शन त्यांना करण्यात येत आहे.
- ऍड. सागर नेवसे, अध्यक्ष, जन- अदालत संस्था

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com