

जवाई- राजस्थान: मानव–बिबट संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी चर्चा सत्रात सहभागी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (डावीकडून तिसरे),जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (डावीकडून चौथे )व अन्य
Sakal
मंचर : आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यांत व अहिल्यानगर जिल्ह्यात वाढता मानव–बिबट संघर्ष चिंतेचा विषय ठरत असून दीर्घकालीन उपायांसाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ राजस्थानातील जवाई येथे अभ्यास दौर्यावर गेले आहे. स्थानिकांचा विश्वास अबाधित ठेवत वन्यजीव संवर्धन व मानवी सुरक्षिततेत समतोल साधण्यावर भर देण्यात आला.