
sakal
पुणे : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगाम राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. धरणे आणि विहिरी तुडुंब भरल्याने पाणी टंचाई जाणवणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.