मंचर - 'मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर दौऱ्यावर आहेत. शांततेने आंदोलन सुरू आहे. पण भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम यांच्याकडून बेताल वक्तव्य केले जात आहे. त्यांतून आंदोलन चिघळावे हा त्या मागील उद्देश आहे.
बेताल वक्तव्य करणाऱ्यां नेत्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.' असा इशारा राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुनील बांगर यांनी सोमवारी (ता.२३) मंचर (ता.आंबेगाव) येथे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
“जरांगे पाटील यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी होत आहे. स्वखर्चाने मराठी बांधव सभेला उपस्थित राहतात. राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास निर्माण होत असतानाच राणे व कदम यांनी कोकणातील एकही मराठा कुणबी दाखले घेणार नाही. जरांगे पाटील यांनी आमचा ठेका घेतलाय का असे पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे.
या वक्तव्याचा निषेध मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. हे नेते मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला खोडा घालून अपशकून करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी समाजाकडून आतापर्यंत निवडणुकांमध्ये मते मिळवून राजकारण करणारे आज मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत. हे दुर्दैव आहे.
या पुढील काळात मराठा समाजाच्या विरोधात राणे व कदम यांनी बेताल वक्तव्य केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच त्यांचे विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. याची नोंद त्यांनी घ्यावी.' असा इशारा ही ॲड बांगर यांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.