मार्केट यार्ड समस्यांच्या विळख्यात; ग्राहक, व्यापाऱ्यांना नाहक त्रास

दररोज मार्केट यार्डात २५-३० हजार लोकांची ये-जा असते. इतकी मोठी वर्दळ असणारे गुळ-भुसार, फळे-भाजीपाला, पान बाजार हा विविध समस्यांच्या विळख्यात अडकला आहे.
Garbage
GarbageSakal

मार्केट यार्ड - दररोज मार्केट यार्डात (Market Yard) २५-३० हजार लोकांची ये-जा असते. इतकी मोठी वर्दळ असणारे गुळ-भुसार, फळे-भाजीपाला, पान बाजार हा विविध समस्यांच्या (Problems) विळख्यात अडकला आहे. कचरा, दुर्गंधी, खड्डे, धुळ, अतिक्रमण, वाहतूकोंडीमुळे अनेक ठिकाणी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु याकडे लक्ष देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने ग्राहक, व्यापारी मात्र त्रासून गेले आहेत.

अस्ताव्यस्त पार्कींगमुळे वाहतूक कोंडी -

शिवनेरी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. तसेच याच रस्त्यावर बाजारात येणारे खरेदीदार जागा मिळेल तिथे गाडी उभा करतात. त्यामुळे या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी असते. बाजारातील सर्व वाहनतळे वाहने लावण्यासाठी अपुरे पडत आहेत. त्यामुळे येणाऱ्या वाहनांसाठी नवीन वाहनतळ उभे करण्याची गरज असल्याची भावाना व्यापारी व्यक्त करत आहेत.

कचरा आणि डुकरांमुळे दुर्गंधी -

मार्केट यार्डात ठीक-ठिकाणी कचरा पडलेला पाहवयास मिळत आहे, त्या कचऱ्यात सातत्याने डुकरे आणि जनावरे वावरत असतात. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक, व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे.

दोन कोटी खर्च करूनही स्वच्छतागृह बंद -

दोन कोटी पेक्षा जास्त खर्च करून समितीने ११ स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. मात्र यातील अनेक स्वच्छतागृह बंद आहेत. त्यामुळे खर्च करून ही स्वच्छतागृह फक्त दिखाव्यासाठीच बांधल्याची भावना बाजारातील व्यापारी, ग्राहक व्यक्त करत आहेत.

Garbage
MPSC : कोर्टाच्या सुनावणीचे कारण देत पुन्हा ४१६ उमेदवारांच्या नियुक्तीस दिरंगाई

अनेक ठिकाणी खड्डे आणि अर्धवट कामे -

समितीने तब्बल साडेबारा ते चौदा कोटी रुपये खर्च करून बाजारात अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. परंतु या रस्त्यावर पुन्हा अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. त्यामुळे बाजार आवारात व्यापारी, कामगार, विक्रेते, खरेदीदारांना या खड्ड्यांचा आणि धुळीचा मोठा त्रास सोसावा लागत आहे. कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना मार्केट यार्डातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

कचरा उचलण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. तसेच ड्रेनेजचे वाहणाऱ्या पाण्याच्या लाइनची लवकरात लवकर दुरुस्ती करून घेण्यात येईल.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

मार्केट यार्ड हे शहरातील सगळ्यात वर्दळीचे ठिकाण आहे. इथे मोठ्या प्रमाणावर खाद्य अन्नाचा व्यापार केला जाती. त्यामुळे बाजारात स्वच्छ्ता असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने बाजार समितीने काळजी घेणे गरजेचे आहे.

- राजेंद्र बाठीया, व्यापारी, मार्केट यार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com