
पुणे : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग देत जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कपात झालेल्या क्षेत्रावरील सातबारा उताऱ्यांवरील ‘एमआयडीसी’चे शिक्के काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमिनींचे व्यवहार करता येणार आहेत. विमानतळासाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार असल्यास त्यांची जमीन घेतली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.