Video : आमदार सदाभाऊ खोत म्हणतात, आता सरकारने...

Untitled-5.jpg
Untitled-5.jpg

पुणे : वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. याबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी कामगार धोरणाबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. बरेच बाहेरचे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अडकलेल्या राज्यातील मजुरांना गावी परतण्याची सोय सरकारने तातडीने  करावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

लाॅकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील अनेक कामगार, मजुर देखील शहरांमध्ये अडकले आहेत. रोजगार नसल्याने या मजुरांचे शहरात हाल होत आहेत. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी. अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल. अशी भीती खोत यांनी व्यक्त केली आहे. 

अडकलेले मजूर गावात परत आल्यानंतर त्यांना जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये क्वारटांईन करुन ठेवा. अशी सूचना ही खोत यांनी केली आहे. निवडणुकीत शहरातील कामगारांना मतदानासाठी गावात आणण्यात सर्वच राजकीय पक्ष पुढे असतात. मग अशा आपत्तीच्या काळात या मजुरांना त्यांच्या गावात विरोध करु नये. असंही खोत यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com