चाळीतील कांदा सडू लागला; शेतकरी हवालदिल

टाकळी हाजी (ता. शिरूर) ः चांगला भाव मिळेल म्हणून चाळीत साठवून ठेवलेला व सध्या सडू लागलेला कांदा.
टाकळी हाजी (ता. शिरूर) ः चांगला भाव मिळेल म्हणून चाळीत साठवून ठेवलेला व सध्या सडू लागलेला कांदा.

टाकळी हाजी (पुणे): कांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी व साठवण क्षमता वाढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देऊन कांदा चाळी बांधल्या. आयात निर्यातीचे धोरण चुकीच्या पद्धतीने राबविल्याने कांद्याचे भाव पडले. भविष्यात भाव मिळेल या अपेक्षेने ठेवलेला कांदा चाळीत सडू लागला आहे. यामुळे पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून येऊ लागली आहे.

शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी घोड व कुकडी नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन केले. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतीचा कांदा पिकविण्यात आला. यासाठी जवळपास एकरी 60 हजार रुपये खर्च करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विकला. त्या वेळीदेखील माती मोल भावाने हा कांदा विकला गेल्याची चर्चा शेतकरी करतात. केंद्र सरकारने कांदाचाळीसाठी अनुदान दिले असले तरी कांदाचाळी उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याच पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात कोणतेच खेळते भांडवल नाही. उलट कर्जाचा बोजा घेऊन पुढच्या पिकाची तयारी करावी लागत आहे. त्यामुळे दरवर्षी कर्जाचा बोजा वाढत आहे. यावर्षी कांद्याला भाव मिळेल, अशी आशा असताना नवीन कांदा बाजारात आला, तरी कांद्याचे भाव स्थिर राहिले. त्यातून बाजारपेठेत जुना कांदा आणू नये, असे फलक झळकू लागल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. जुन्या कांदा चाळीतून आता पाणी निघून कांदा सडण्याचा प्रकार होत आहे. जनावरेदेखील या कांद्याला तोंड लावत नसल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com