पाणी टंचाईच्या गडद छायेतून यंदा पुणे जिल्हा बाहेर

Water-Tanker
Water-Tanker

पुणे - पुणे जिल्हा यंदा तीव्र पाणीटंचाईच्या गडद छायेतून पुर्णपणे बाहेर आला आहे. जिल्ह्यातील कायम दुष्काळी आणि टंचाईग्रस्त समजलेल्या जाणाऱ्या बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आणि खेड या पाच तालुक्यात अद्याप एकही टॅकर सुरू झालेला नाही. सध्या भर उन्हाळ्यात तेरापैकी अवघ्या दोन तालुक्यात केवळ दहा टॅकर सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी आजअखेर (ता. ४) तब्बल सव्वाशे  टॅकर सुरु करावे लागले होते.

शिवाय दरवर्षी टँकरची सुरुवात ही बारामती, इंदापूर, पुरंदरसह दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पाचपैकी एका तालुक्यातून होत असे. विशेष म्हणजे यंदा हे पाचही तालुके किमान आजपर्यंत तरी टँकरमुक्त आहेत. 

सध्या आंबेगाव आणि खेड या दोन तालुक्यात १० टँकर सुरु झाले आहेत. यापैकी आंबेगाव तालुक्यात नऊ तर, खेड तालुक्यात एक टँकर सुरु आहे. आंबेगाव तालुक्यातील आठ गावे आणि २३ वाड्या-वस्त्या आणि खेड तालुक्यातील एक गाव व १३ वाड्या अशा एकूण फक्त नऊ गावे ३६ वाड्या-वस्त्यांमधील १२ हजार ७१७ लोकसंख्येला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा. पुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com