Chandrashekhar Bawankule
sakal
पुणे - पानशेत धरण दुर्घटनेला तब्बल ६६ वर्षे उलटून गेल्यानंतर, या दुर्घटनेतील विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शहरातील सुमारे २० हजार कुटुंबांना जागेची मालकी मिळणे, अतिक्रमणांचे नियमितीकरण, जमिनीचे हस्तांतरण आणि पुनर्वसन करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.