Pune : स्वच्छ भारत अभियान बनले लोकचळवळ - चंद्रकांत पाटील

ग्रामीण आणि शहरी भागातील स्वच्छतेवर विशेष लक्ष
pm modi Swachh Bharat Mission chandrakant patil pune
pm modi Swachh Bharat Mission chandrakant patil punesakal

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१४ मध्ये सुरू झालेल्या'स्वच्छ भारत अभियान’ आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. देशातील नागरिकांनी यात सहभाग घेतल्यानेच हे अभियान यशस्वी ठरले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे महापालिका येथे दक्षिण गोलार्धातील विविध देशांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत पुणे शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पुणे महानगरपालिका व कचरा वाचकांच्या स्वच्छ मॉडेल संदर्भातील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंटचे प्रमुख अतुल विश्वास आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आले. पुण्याने यामध्ये विशेष प्रयत्न केले. ‘स्वच्छ मॉडेल’ यशस्वी ठरले आहे. त्याची दखल अन्य देशातील प्रतिनिधींनी घ्यावी वाटली ही अभिमानाची गोष्ट आहे. आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, देशात स्वच्छ भारत अभियानाला चांगले यश मिळाले आहे. या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com