निकषांच्या निषेधार्थ अन्नत्याग

Police
Police

पुणे - राज्य सरकारच्या गृह विभागाने पोलिस भरती प्रक्रियेमध्ये केलेल्या बदलांच्या निषेधार्थ उमेदवारांकडून शुक्रवारपासून (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने १८ जानेवारीला भरती प्रक्रियेबाबत नवीन निकष असलेला आदेश जाहीर केला. त्यामध्ये शारीरिक चाचणीचे गुण कमी करून ५० ठेवले, तर लेखी परीक्षेचे गुण १०० असे १५० गुणांची परीक्षा ठेवण्याच्या निकषाचा फटका लाखो उमेदवारांना बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले आहे. 

नव्या निकषांमुळे १२ वी उत्तीर्ण असलेले उमेद्वार या भरतीपासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. या निर्णयाबाबत वारंवार आवाज उठवूनही सरकारने दखल घेतली नाही, त्यामुळे नाइलाजास्तव अन्नत्याग उपोषण करावे लागत असल्याचे उमेदवारांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

उमेदवारांच्या मागण्या
  शारीरिक चाचणी सुरवातीलाच घ्यावी.
  शारीरिक चाचणीचे १०० गुण असावेत.
  शारीरिक चाचणीसाठीही टक्केवारीप्रमाणे गुणांची अट असावी.
  १ः५ ऐवजी पूर्वीप्रमाणे १ः१५ असे प्रमाण ठेवावे.
  शारीरिक चाचणी झाल्यानंतरच लेखी परीक्षा घ्यावी.
  मेगा पोलिस भरती घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com