

Critical Insight by Suhas Palshikar: Universities Being Made Ineffective in New Social Setup
Sakal
पुणे: ‘‘सामाजिक सत्ता व्यवहारामुळे आजची विद्यापीठे ज्ञान व्यवहारापासून दूर जात आहेत. विद्यापीठांना काहीही करता येणार नाही, अशी समाज व्यवस्था घडवली जात असून ती सशक्त केली जातेय. त्यामुळे विद्यापीठे आहे तशीच राहत असून त्यांचा कोणाला अडथळा होत नाही. तसेच त्यांचे प्रश्न विचारणे देखील बंद झाले आहे,’’ असे मत राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक व अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले.