

MP Shahu Chhatrapati Maharaj
पुणे - ‘रयतेचे राज्य म्हणजे केवळ लोकप्रिय घोषणा नसून ती एक जबाबदारी आहे. शिवरायांचे राज्य हे ‘न्याया’चे होते. आजच्या व्यवस्थेतही त्याच न्यायाची, पारदर्शकतेची आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणाऱ्या आदराची नितांत गरज आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेचा अंगीकार करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले.