पुणे शहरात खड्ड्यांची धास्ती; महत्वाचे रस्ते न खोदण्याचे आदेश

पुणे शहरात समान पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे रस्त्यांची चाळण झाल्याची धास्ती प्रशासनाने घेतली आहे.
Vikram Kumar
Vikram KumarSakal
Summary

पुणे शहरात समान पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे रस्त्यांची चाळण झाल्याची धास्ती प्रशासनाने घेतली आहे.

पुणे - शहरात समान पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे रस्त्यांची चाळण झाल्याची धास्ती प्रशासनाने घेतली आहे. सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करून रस्ते दुरुस्त केले जाणार असल्याने त्यावर पुन्हा खड्डे पाडू नका. पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनी रस्त्यावरून टाकण्याऐवजी पादचारी मार्ग किंवा इतर पर्यायी रस्ते शोधा आणि कामे करा असे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

गेल्या तीन वर्षापासून शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. सुमारे ६०० किलोमीटरच्या जलवाहिनी टाकण्याचे काम आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. पण जलवाहिनी टाकल्यानंतर रस्ते पुर्ववत करताना खडी, मुरूम टाकून दबाई न करता थेट सिमेंट काँक्रिट टाकल्याने अनेक भागातील रस्ते खचले आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून पुणेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील रस्त्यावरून महापालिकेला लक्ष केले जात आहे. त्यातच २०२३ मध्ये ‘जी २०’ ही आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यात होणार आहे. त्यानिमित्ताने परदेशातील उच्चपदस्थ अधिकारी, मंत्री पुण्यात येणार असल्याने पुढील काही महिन्यात रस्ते चकाचक करण्याचे आव्हान पथ विभागापुढे आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून ५७ रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी २१७ कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे. तर पुढील टप्प्यात आणखी ३०० कोटीच्या खर्चाला मान्यता दिली जाईल.

५०० कोटी रुपये खर्च करून महत्त्वाचे रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत. त्यातच समान पाणी पुरवठा योजनेचे काम २०२३ मध्ये पूर्ण करायची आहे, या योजनेसाठी आणखी ७०० किलोमीटरचे रस्ते खोदले जाणार आहेत. पण हे काम करताना ज्या ठिकाणी डांबरीकरण केले जाईल त्या रस्त्यावर किमान तीन वर्ष कोणत्याही कारणाने खोदकाम करू नका. जलवाहिनी टाकण्यासाठी पादचारी मार्गाचा वापर करा किंवा परिसरातील इतर रस्त्यावरून जलवाहिनी वळवा असे आदेश विक्रम कुमार यांनी दिले आहे.

‘पुढील काही महिन्यात शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण होइल. त्यावेळी ज्या भागात महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत, तेथील महत्त्वाच्या रस्त्यांवर खोदकाम करू नये. तसेच वाहतूक कोंडीत भर पडले असे काही करू नये असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

पाणी पुरवठा विभाग करणार अभ्यास

शहरात अजून ७०० किलोमीटरच्या जलवाहिनी टाकण्याचे काम शिल्लक आहे. पण मेट्रो, उड्डाणपुल असे प्रकल्प सुरू असलेल्या भागातील महत्त्वाचे रस्ते खोदू नयेत असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे या जलवाहिन्या टाकण्यासाठी कोणत्या भागात किती जागा उपलब्ध आहे, पर्यायी मार्ग कोणते असू शकतील याचा अभ्यास पाणी पुरवठा विभाग करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com