Devendra Fadnavis : पहाटेच्या शपतविधीवर अर्धच बोललो, उरलेल योग्यवेळी बोलणार

पहाटेच्या शपतविधीबाबत मी जे काही बोललो आहे ते पूर्ण सत्य बोललो आहे. पण मी अर्धच बोललो आहे वेळ आल्यावर उरलेलं बोलेन.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Summary

पहाटेच्या शपतविधीबाबत मी जे काही बोललो आहे ते पूर्ण सत्य बोललो आहे. पण मी अर्धच बोललो आहे वेळ आल्यावर उरलेलं बोलेन.

पुणे - पहाटेच्या शपतविधीबाबत मी जे काही बोललो आहे ते पूर्ण सत्य बोललो आहे. पण मी अर्धच बोललो आहे वेळ आल्यावर उरलेलं बोलेन असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, ‘‘खासदार बापट यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे. पण ते प्रचाराला येऊ शकत नसल्याने त्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स आम्हाला दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. कसबा आणि चिंचवडच्या या दोन्ही जागा आम्ही जिंकणार आहोत. अमित शहा हे कसब्याच्या निवडणुकीसाठी पुण्यात येणार नाहीत. तर त्यांचा दौरा पूर्वनियोजित आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस यांचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला, त्यावर फडणवीस म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला. पण इतिहासातून आपण अनेक गोष्टी शिकत असतो, तसेच अभिमन्यूकडूनही शिकलो आहोत. विरोधकांचे चक्रव्यूह कसे तोडायचे हे आम्ही शिकलो असून, राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सरकार स्थापन केले आहे. पहाटेच्या शपतविधीबाबत मी सत्य बोललो आहे, पण त्याचे वेगवेगळे अर्ध काढले. मी काय बोललो शांतपणे ऐका, तेव्हाच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा. आपोआप तुम्हाला त्याची कडी जोडता येईल. दुसऱ्या पुराव्याची गरज पडणार नाही.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे. ही ती पिटिशन लावून घ्यावी आमचे प्रयत्न आहे. बीबीसीच्या कार्यालयात प्राप्तीकर विभागाने तपासणी केल्याने मोदींवर होत असलेल्या टीकेवर फडणीस म्हणाले, ‘‘अमित शहा यांनी सांगितले पूर्वीच सांगितले आहे की आपल्या विरोधात खोट नॅरेटिव्ह बनवले जात आहे. पूर्वी काँग्रेस नेत्यांनी हे केले, काही माध्यमेही करत आहेत. २००२ पासून नरेंद्र मोदींना लक्ष केले जात आहे पण तरीही लोकांचा मोदी यांना पाठिंबा आहे.

कोयता काढला तर ठोकून काढू

कोयत्याचा उल्लेख लोखंडी शस्त्र असा करावा असे कोणतेही फर्मान काढलेले नाही. कोणी कोयता काढून फिरत असेल तर आम्ही त्याला ठोकून काढणार, असे फडणवीस यांनी सांगितले.

पोस्टर कोणी लावले हे लवकरच कळणार

कसबा विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज असल्याचे पोस्टर लागले. त्यावर फडणवीस म्हणाले, उमेदवारी न मिळाल्याने काही लोकांना मध्ये नाराजी असू शकते. संपूर्ण ब्राह्मण समाज नाराज नाही. तो संकुचित विचारांचा नाही. पण हे ब्राह्मण समाजाने लावलेले नसून, ते कोणी लावले हे लवकरच तुम्हाला कळेल, असा दावा फडणवीस यांनी केला.

मनसे आता हिंदुत्ववादी आहे

कसब्यात मनसेने भाजपला पाठिंबा दिला त्याबद्दल फडणवीस म्हणाले, ‘निवडणुकीत सगळ्यांची मदत लागते आणि तुम्हाला माहिती आहे की मनसे ने आपली भूमिका हिंदुत्ववादी केली आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com