Pune : महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमदार फुटण्याची भिती

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला.
Bhagwat Karad
Bhagwat Karadesakal

पुणे : महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचे आमदार फुटण्याची भीती आहे, त्यामुळे ते भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरकार पडेल व मध्यावधी निवडणूका होतील बोलत आहेत. आमचे सरकार एकदम सुरक्षीत असून, अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू असा विश्‍वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला.

डॉ. भागवत कराड यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत संवाद साधला. महाविकास आघाडीचे नेते मध्यावधी निवडणुकीचा दावा करत आहेत त्याबद्दल कराड म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचे उरलेले आमदार फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे हे आमदार पक्ष सोडून कोठेही जाऊ नये यासाठी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरकार पडेल असे बोलत आहेत. उलट गेली अडीच वर्ष राज्यातील विकास ठप्प झाला होता. आता आमचे सरकार आल्यानंतर विकास पुन्हा वेगात सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत. त्यामुळे या सरकारला कोणताही धोका नाही. आम्ही अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू.

ते जेवढे चालतील तेवढी काँग्रेस संपेल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या पदयात्रेला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्याबद्दल विचारले असता कराड म्हणाले, ‘‘या पदयात्रेला नागरिकांचा पाठिंबा नाही. त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला होणार नाही. राहुल गांधी जेवढे चालतील, तेवढी काँग्रेस संपणार आहे. यापूर्वीही असेच घडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com