Pune : पावसाळा संपताच ठणठणाट असलेल्या वन तळ्यांमध्ये किती निधी मुरला?

घेरा सिंहगड हद्दीतील निकृष्ट कामाबाबत नागरिकांचा संताप
वन तळ्यांची गरज काय
वन तळ्यांची गरज कायsakal

सिंहगड : लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्चून तयार करण्यात आलेल्या 'वन तळ्यां'मध्ये पावसाळा संपून महिना होत नाही तोच ठणठणाट झाला आहे. निकृष्ट कामे करुन शासकीय निधीचा अपव्यय 'कोणाच्या हितासाठी' सुरू आहे असे म्हणत नागरिक वन विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आहेत. वन विभागाचे अधिकारी मात्र 'मुग गिळून' गप्प असल्याचे दिसून येत आहे.

सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत काळूबाई डोंगर परिसरात वन विभागाच्या माध्यमातून दोन मोठे 'वन तळे' तयार करण्यात आलेले आहेत. तसेच सध्या एक पाणवठा तयार करण्याचे काम सुरू आहे. वन तळे आकाराने अत्यंत मोठे व खोल आहेत मात्र ते पावसाळा संपताच कोरडे ठण पडले आहेत. वन तळ्यांचे काम अत्यंत निकृष्ट व प्राण्यांचा कोणताही विचार न करता केवळ निधी संपविण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तसेच कामाचे इस्टीमेट, दर्जा व उपयुक्ततेबाबत वनरक्षक बाळासाहेब जिवडे व भांबूर्डा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्याकडे विचारणा केली असता ते याबाबत जाणिवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचाही आरोप नागरिक करत आहेत.

माध्यमांपर्यंत ही माहिती कशी गेली?

घेरा सिंहगड हद्दीत वन तळे तयार करण्यात आले आहेत व पाणवठ्याचे काम सुरू आहे ही माहिती माध्यमांपर्यंत कशी गेली? असे म्हणत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना तर कनिष्ठ अधिकारी परिसरातील नागरिकांना धारेवर धरत आहेत. धक्कादायक म्हणजे असे असेल तर या भागात निधी टाकणार नाही अशी धमकीही अधिकारी नागरिकांना देत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

याबाबत वन विभागाचे मौन.......

•घेरा सिंहगड हद्दीत तयार करण्यात आलेल्या वन तळ्यांचा उद्देश काय?

•एकूण किती वन तळी तयार करण्यात आली आहेत?

•एकूण किती खर्च झालेला आहे?

•वन तळे तांत्रिक दृष्ट्या प्राण्यांचा विचार करून तयार करण्यात आले आहे का?

•जर पाऊस उघडल्यानंतर तळ्यात पाणी राहत नसेल तर पाऊस सुरू असताना वन तळ्यांची गरज काय?

"दर वर्षी वन विभागाकडून निकृष्ट कामावर निधी उधळला जातो. वन विभाच्या कारभारावर स्थानिक नागरिक लक्ष देत नाहीत तसेच जे जागृक नागरिक लक्ष देतात त्यांना वन विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. अधिकारी व ठेकेदार यांच्याकडे वारंवार अंदाजपत्रकाची मागणी केली परंतु ते जाणीवपूर्वक प्रतिसाद देत नाहीत. शासनाचा निधी म्हणजे जनतेचाच पैसा आहे त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे." अक्षय जाधव, सिव्हिल इंजिनिअर, मणेरवाडी (ता. हवेली)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com