

पुणे : भामा-आसखेड धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने शहराच्या पूर्वोत्तर भागातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय पक्ष नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी १२ जुलैपासून सुरू केली जाणार आहे. आषाढी वारीमुळे ही पाणी कपात काही दिवस लांबणीवर पडली आहे. दरम्यान यावर प्रशासनाकडून लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.