पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावेत - चंद्रकांत पाटील

पुरंदर - तालुक्‍यातील भिवरी, बोपगाव, चांबळी आणि हिवरे भागातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील.
पुरंदर - तालुक्‍यातील भिवरी, बोपगाव, चांबळी आणि हिवरे भागातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील.

पुणे - ‘अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्यात येत असून, संबंधित विभागांना तशा सूचना दिल्या आहेत. येत्या सहा नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करावेत,’’ असे आदेश महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

पुरंदर तहसील कार्यालयात सोमवारी पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, तहसीलदार रूपाली सरनोबत, सोनाली मेटकरी, विजय पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

बाधित क्षेत्रांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावेत, आवश्‍यकता भासल्यास पंचनाम्याची पथके वाढविण्यात यावीत, प्राथमिक स्तरावर राज्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित मदतीबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, असे त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री पाटील यांनी प्रारंभी तालुकानिहाय नुकसानीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी सकाळी पुरंदर तालुक्‍यातील भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com