

Ignoring Rural Economy: Raju Shetty Criticizes Government's Neglect of Agriculture
Sakal
नारायणगाव : रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेले शेती, वस्र उद्योग, लघुउद्योग याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे देशात रोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक समता,बंधुता राखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.