दरोडेखोराच्याच हाती तिजोरीच्या किल्ल्या : राजू शेट्टी

pune.jpg
pune.jpg

पुणे :''दरोडेखोराच्या हातात तिजोरीची किल्ली असेल तर काय न्याय मागणार अन् आम्हाला अडविण्याचा त्यांना काय नैतिक अधिकार आहे ?'' असे टोला स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सहकारमंत्र्यांना लगावला. पुण्यात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाच्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ''शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांचा गैरवापर करुन त्यावर कर्ज काढले आहेत. अर्थात राष्ट्रीयकृत बॅंकाचे अधिकारी देखील सहभागी आहेत.  कर्ज थकित गेल्यानंतर शेतकाऱ्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते कर्जदार असल्याचे समजले. हे कर्ज कसे काढले? त्याची केवायसी का नाही तपासली गेली? हा प्रकार सहकारमंत्र्याच्या अधिपत्याखालील लोकमंगलमध्ये घडतो आहे. मग त्यांना बोलयचा काय अधिकार? सहकारमंत्री स्वतः एफआरपीचे 77 कोटीचे थकबाकीदार आहेत.'' 
 
आज झालेल्या शेतकरी मोर्चाबाबत बोलताना ते म्हणाले, ''शेतकऱ्यांचे दोन महिन्यांपासून आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. लाठ्या- काठ्या खाल्या. पण शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केले.  मुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर आयुक्तांनी किती बैठका बोलवल्या? या सगळ्यांची काहीच जबाबदारी नसेल तर राज्यात कायद्याचे राज्य नाही. म्हणुन साखर आयुक्तांना आमचे अधिकार काय आहेत आणि त्यांच्या जबाबदारी काय आहेत हे सांगण्यासाठी आज साखर संकुलात आलो आहोत. त्यासंदर्भात ते काय निर्णय घेणार आहेत हे विचारणार आहोत. काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.

एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी सकाळी शेतकऱ्यांच्या आसूडाच्या कडकडाटात अलका टॉकीज चौकातून मोर्चाला सकाळी सुरवात झाली होती. पुण्यात टिळक चौकात राज्यभरातून सुमारे एक हजार शेतकरी उपस्थित होते. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेचा सरकार विरोधात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. राजू शेट्टी यांनी डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरवात केली. मोर्चामध्ये राजू शेट्टींसह अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रणेते योगेंद्र यादव, स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर देखील सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. दरम्यान मोर्चामुळे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही काळ वाहतूक बंद होती. त्याचा जंगली महाराज रस्त्यावर वाहतूकीचा ताण येत होता. मोर्चा पुढे गेल्यानंतर मागील बंद वाहतूक सोडण्यात आली त्यामुळे वाहतूक कोंडी तासभर सुरळीत झाली.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com