भामा आसखेडमधून उन्हाळी आवर्तन

भामा आसखेडमधून उन्हाळी आवर्तन

आंबेठाण : सुरुवातीला खेड, शिरूर आणि आता पुणे शहराला वरदान ठरलेल्या भामा आसखेड धरणातून चालू वर्षातील दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या धरणात ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आलेगाव पागा पर्यंत असणारे बंधारे भरण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे.यावर्षी धरण शंभर टक्के भरले होते.

१ जून पासून धरणात १०५५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.भामा आसखेड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे.धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. 

आज दुपारी दोन वाजलेपासून धरणाच्या चारही दरवाजातून २७५ क्युसेसने हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सध्या धरणात उपयुक्त पाणीसाठा ६.२० टीएमसी असून जिवंत पाणीसाठा ५.७२ टीएमसी शिल्लक आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com