पुणे - कोरेगाव-भीमा येथे झालेली दंगल पूर्वनियोजित नव्हती. दंगल घडवून आणण्यासाठी कोणा व्यक्तीला किंवा कोणत्याही संघटनेला जबाबदार धरणे कठीण आहे.
भीमा नदीवरील पुलावर जमलेल्या जमावाला पोलिसांनी पेरणे फाट्याकडे जाण्यापासून रोखले. त्यामुळे परिस्थिती चिघळण्यापासून वाचली, अशी साक्ष शिक्रापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिली.
कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीसंदर्भात कोरेगाव भीमा आयोगापुढे त्यांची बुधवारी (ता.१३) साक्ष नोंदविण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल आणि सदस्य सुमीत मलीक यांच्या दोन सदस्यीय आयोगाने ही साक्ष नोंदवली. आयोगाचे अधिवक्ते आशिष सातपुते यांनी साक्षीदार तपासले.
जमावाला पुलावर रोखल्याने जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यात आम्हाला यश आले. एक जानेवारी २०१८ रोजी विजयस्तंभ येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या आमच्या अपेक्षेप्रमाणे होती. मात्र, दंगल होर्इल अशी माहिती पोलिसांना नव्हती.
त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुरेसे पोलिस दल, पोलिस दलाची वाहने, पाण्याचे फवारे, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तेथे उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे गलांडे यांनी आयोगास सांगितले. शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात सक्रिय सहभाग असलेल्या हर्षाली पोतदार यांची उद्या (ता. १४) साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.