पुणे - शेतकऱ्यांच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे. या प्रकल्पावर कितीही खर्च झाला तरी चालेल, पण तो पूर्ण झाल्यास देशात पाण्याचा कधीच तुटवडा कधीच भासणार नाही, असे मत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. नोबल ॲग्रो फाउंडेशन आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. आमदार विद्या चव्हाण, शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार, निवृत्त न्यायाधीश जी. डी. इनामदार, विजय जावंधिया, शामराव देसाई, उत्तमराव शिंदे सरकार, भगवानराव वैराट आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल पवार यांनी प्रास्ताविक केले. अरुण नरके यांना ‘सहकार रत्न’, तसेच, जावंधिया, विठ्ठल काटे, राजेश इनामदार, प्रकाश कुतवळ, आबेदा इनामदार, महेश मोहोळ, रोहित विश्वकर्मा, किशोर बरकाले आणि बाळासाहेब गायकवाड यांनाही पुरस्कार देण्यात आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.