रस्तारुंदीकरणाची आडकाठी आता दूर

Home
Home

पुणे - केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेची गतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य सरकारने ग्रामीण भागात अशा प्रकल्पांसाठी रस्तारुंदीचे असलेले बंधन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय जमिनींवर या प्रकल्पांसाठी ही सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांना आता कमीत कमी साडेचार मीटर रुंदीच्या रस्त्यावरदेखील मान्यता दिली जाणार आहे.

‘सर्वांसाठी घरे’ प्रकल्पांतर्गत परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यांना चालना देण्यासाठी मान्य ‘एफएसआय’बरोबरच अन्य अनेक सवलती केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, शासकीय जमिनीदेखील अशा प्रकल्पांसाठी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे.

मात्र, ग्रामीण भागात अशा प्रकल्पांची अंलबजावणी करताना रस्तारुंदीचे बंधन येते. त्यामुळे जागा आहे; परंतु त्यावर बांधकाम आराखडे मंजूर करण्यास रस्तारुंदीच्या बंधनामुळे अडथळे येतात, अशी परिस्थिती आहे. परिणामी, प्रकल्प मार्गी लागण्यात अडचणी येतात. हे विचारात घेऊन राज्य सरकारने ग्रामीण भागात शासकीय जमिनींवर अशा प्रकाराचे प्रकल्प राबविण्यासाठी रस्तारुंदीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा आदेश राज्य सरकारच्या नगर विकास खात्याच्या अवर सचिव वीणा मोरे यांनी काढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com