Manjri : कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय अमान्य ; खोतीदार व रयत शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खोतीदारांना मांजरी उपबाजारात काही अटी शर्ती टाकून शेतमाल विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही परवानगी देताना टाकलेल्या अटी शर्ती अतिशय जाचक असून बाजार समिती आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार करीत आहे, असा आरोप खोतीदार व रयत शेतकरी संघटनेने केला आहे
मांजरी : खोतीदार बाळासाहेब भिसे व रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी उपोषण स्थळावरून बाजारसमितीचा निर्णय मान्य नसल्याचे सांगितले.
मांजरी : खोतीदार बाळासाहेब भिसे व रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी उपोषण स्थळावरून बाजारसमितीचा निर्णय मान्य नसल्याचे सांगितले.pune

मांजरी : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खोतीदारांना मांजरी उपबाजारात काही अटी शर्ती टाकून शेतमाल विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही परवानगी देताना टाकलेल्या अटी शर्ती अतिशय जाचक असून बाजार समिती आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार करीत आहे, असा आरोप खोतीदार व रयत शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्या आत्मदहनाच्या इशाऱ्यावर ठाम असून खोतीदार बाळासाहेब भिसे यांनीही आपले उपोषण पुढे सुरूच ठेवले आहे.

मांजरी उपबाजारात खोतीदारांच्या प्रवेशावरून बाजारसमिती प्रशासन व खोतीदार, शेतकरी संघर्ष गेली अडीच महिन्यांपासून सुरू आहे. खोतीदारीच्या नावाखाली येथील उपबाजारात शेतमालाची दुबार विक्री होऊन आपला शेतमाल घेऊन येत असलेल्या खऱ्या शेतकऱ्यावर मात्र, अन्याय होत आहे. असा आरोप करीत बाजारसमितीने येथील सर्वच खोतीदारांना बाजारात माल घेऊन येण्यास बंदी केली आहे. ही बंदी उठवून खोतीदारांना बाजारात प्रवेश मिळावा म्हणून खोतीदारांचे प्रतिनिधी बाळासाहेब भिसे यांचे बाजारासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. तर खोतीदारांना मज्जाव केल्यामुळे शेतकऱ्यांचे माल शेतातच सडू लागले असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे खोतीदारांना प्रवेश न मिळाल्यास रयत शेतकरी संघटनेच्या वतीने समिती प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

त्याची दखल घेऊन बाजारसमितीने खोतीदारांना बाजारात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचवेळी खोतीदार शेतकरी करार सादर करावा, मदतनीस ठेऊ नये, कोरेगाव मूळ येथील बाजार सुरू होईपर्यंतच येथे खोतीदारांना माल आणता येईल, आदी विविध जाचक अटी खोतीदारांवर लादल्या असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटना व खोतीदारांनी आपले उपोषण व आत्मदहनाचा निर्णय कायम केला आहे.

"बाजार समितीने खोतीदार बाजारात येऊच नयेत, हा उद्देश ठेवूनच अटी व नियम बनविले आहेत. खोतीदारांना व शेतकऱ्यांना त्यातून न्याय मिळू शकत नाही. समिती लादू पाहत असलेला हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा व चर्चा करून सर्वांना सोयीस्कर निर्णय घ्यावा. समितीने न्याय भूमिका न घेतल्यास उद्याच्या आत्मदहनाचा आमचा निर्णय कायम आहे.' रामदास कोतवाल

जिल्हाध्यक्ष, रयत शेतकरी संघटना

"आम्ही गेली अनेक वर्षे खोतीदार म्हणून बाजारात येत आहोत. समितीने मज्जाव केल्याने आम्हा पन्नाससाठ जणांच्या कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता नियम व अटी टाकून आम्हाला व्यवसायच करता येणार नाही, अशी परिस्थिती केली आहे. जोपर्यंत समिती सर्वसमावेशक निर्णय घेत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील.'

बाळासाहेब भिसे, खोतीदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com