'सकाळ साप्ताहिक'चे डॉ. ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन; अंक सर्वत्र उपलब्ध

'सकाळ साप्ताहिक'चे डॉ. ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन; अंक सर्वत्र उपलब्ध

पुणे : ''साहित्यातही वाड्‌मय बाह्य गोष्टी शिरल्या आहेत. साहित्य संमेलने आणि साहित्यावर त्याचा परिणाम होत आहे. अशा वेळी लोकांना बदल हवा होता. संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यिकाकडे सन्मानाने यावे.हीच भावना संगीत,चित्रपट कलावंत,साहित्यिकांतून व्यक्त होत होती. त्या बदलाची मी निमित्त झाले.''असे स्पष्ट करीत यवतमाळ येथे होणाऱ्या 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ.अरुणा ढेरे यांनी नव्या बदलातून सकारात्मक गोष्टी घडतील,हा आशावादही व्यक्त केला. 

'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सकाळ साप्ताहिक' या मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ.ढेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, सकाळचे संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ,संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शितल पवार,सकाळ साप्ताहिक च्या सहसंपादक ऋता बावडेकर उपस्थित होत्या. 

डॉ.ढेरे म्हणाल्या, ''निवडणूकीची प्रक्रियेमुळे अनेक दिग्गज साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष होता आले नाही. किंबहुना निवडणूका नकोच या भावनेने अनेक साहित्यिक दूर गेले. दूर गेलेल्या साहित्यिकांमुळे मोठी वैचारिक ताकद बाजूला राहिली. नकोच ती निवडणूक या प्रक्रियेमुळे इंदिराबाईंसारख्या साहित्यिकही अध्यक्ष होऊ शकल्या नाहीत. समाजातील अनेक स्तरांतील व्यक्तींना बदल पाहिजे होता.'' 

''जगभरातील वास्तवाच्या अनेक लाटा येऊन आदळत आहेत.सामान्य माणसाच्या ते पचनी पडणे अवघड झाले आहे.परिवर्तनाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.पूर्वी बदलाचा वेग संथ होता.गेल्या 20-25 वर्षांमध्ये शंभर पटीने हा वेग वाढला आहे. वाचनातून वाचकांची भूक भागते. मात्र दर्जेदार साहित्याची भूक सर्वसामान्यांना अपेक्षित आहे. त्या जबाबदारीचे भान ओळखून साहित्य विचार समाजापुढे मांडावे लागतात. हीच भान ठेवून 'सकाळ'ने प्रकाशित केलेले दिवाळी अंक 'समाजमनाचे प्रतीक' आहेत. '' असे कौतूकोद्गारही डॉ.ढेरे यांनी काढले. 

पवार म्हणाले,''फेकन्युजची चर्चे सर्वत्र सुरू आहे. अशा बातम्यांमुळे लोकशाहीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र वास्तव मांडण्याचा प्रयत्न सकाळ ने नेहमीच केला. सकाळ साप्ताहिक 'ला साहित्यविश्‍वात दर्जेदार अंक म्हणून ख्याती आहे. बौद्धिकवर्गाचीही त्यास मान्यता आहे.कथा-कविता-दीर्घकथा-ललित,भटकंती या सारखे साहित्य यंदाच्या अंकात वाचनांसाठी उपलब्ध आहे.'' तर बावडेकर यांनी डॉ. ढेरे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी वादातीत निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com