संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम शेतक-यांनी बंद पाडले

संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील गोजुबावी व कटफळ गावातील शेतक-यांनी निवाडा रक्कम चुकीची असल्याच्या निषेधार्थ या मार्गाचे काम आज बंद पाडले.
Agitation
AgitationSakal

बारामती - संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील गोजुबावी व कटफळ गावातील शेतक-यांनी निवाडा रक्कम चुकीची असल्याच्या निषेधार्थ या मार्गाचे काम आज बंद पाडले.

गोजुबावी व कटफळ या गावातील बाधित शेतक-यांना प्रति गुंठा चार लाख सहा हजार या प्रमाणे नुकसान भरपाईबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र पुन्हा शेतक-यांना नवीन नोटीस प्राप्त झाली असून निवाडा दुरुस्त करुन सदरची नोटीस आल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

बाजारभावाच्या मूल्यापेक्षा कमी मूल्यांकन करुन नवीन नोटीस दिल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. बेकायदा दुरुस्त केलेला निवाडा रद्द करा, पूर्वीच्या निवाड्यानुसारच मोबदला द्यावा, मोबदला दिल्याशिवाय काम सुरु करु नये अशा मागण्या शेतक-यांनी केल्या आहेत. या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे काम करु देणार नसल्याची भूमिका शेतक-यांनी घेतली आहे. या बाबत 29 सप्टेंबर रोजी अर्ज दिलेला असतानाही उपविभागीय अधिका-यांनी दडपशाही पध्दतीने काम सुरु ठेवल्याचाही आरोप करण्यात आला.

Agitation
Pune : 'सहकारी संस्थांना अधिकारांसाठी भांडावे लागेल'

महामार्ग कायदयानुसार सहा महिन्यानंतर निवाडा दुरुस्त करता येत नाही, असे असताना दोन वर्षांनंतर निवाडा दुरुस्त करुन गोजुबावी व कटफळ गावातील शेतक-यांना बाजारभावाच्या मूल्याहून कमी किंमतीच्या नोटीसा कशा काय पाठवल्या गेल्या असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मूल्यांकन नियमानुसारच...

मूल्यांकनाचा विषय फक्त गोजुबावीपुरताच मर्यादीत आहे. शासकीय मूल्यांकन हे योग्यच आहे, त्याच कमी मूल्यांकनाचा विषय नाही- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com