शाळेचे वर्ग अद्याप शाळेच्या ताब्यात नसल्याने शाळा बंदच

दीड वर्षापासून जळीतग्रस्त कुटुंबीय घरांच्या प्रतीक्षेत
pune
punesakal

कॅन्टोन्मेंट : राज्यसरकार कडून शाळा सुरू करण्याचा निर्णय देण्यात आला. मात्र अद्याप शाळेचे वर्ग खोल्या ताब्यात नसल्याने शाळा समितीने शिक्षण मंडळासह मनपा व नगरसेवक यांच्याकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

दीड वर्षापूर्वी टिंबर मार्केटमधील इलेक्ट्रिकच्या गोडाऊनला लागलेल्या आगीच्या झळ मुळे शेजारील दहा झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी कुटुंबियांचे तात्पुरत्या स्वरूपात तत्कालीन उपमहापौरांनी जळितग्रस्त झोपडीधारकांचे गंज पेठेतील (सहा नंबर कॉलनी) आचार्य विनोबा भावे शाळेमध्ये तात्पुरती व्यवस्था केली होती. कुटुंबियाना पर्यायी व्यवस्था नसल्याने ते आजही शाळेतच राहत आहे . राज्य शासनाच्या निर्णयाने ४ ऑक्टोबर रोजी शाळा सुरू झाल्या असून, येथील नागरिक मुलांना शाळेत पाठविण्यासाठी उत्सूक आहेत. मात्र, शाळेमध्ये झोपडपट्टीतील नागरिक तेथे राहत असल्यामुळे पालकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी त्यांना तेथून हलवावे, अशी मागणी शाळा समितीने निवेदनाद्वारे केली आहे

पुणे मनपा व आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 201 विद्यार्थी संख्या असलेले इयत्ता 8 वी ते 10 चे वर्ग याशाळेत चालविले जातात. शाळेमध्ये फक्त एकच स्वच्छतागृहाची सोय आहे. त्यामध्ये राहण्यास आलेले नागरिक ही त्याचाच वापर करतात. त्यामुळे या लोकांचे तातडीने पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करावे असे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मेहजबिन शेख, जयवंत सकट, रुबिना खान, कौसर शेख, परविण शेख यांनी मागणी केली आहे.

pune
मोरेबाग, सावंत विहारमध्ये पाणीसंकट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

तसेच यासंदर्भात रहिवाशी अनीता गायकवाड यांनी सांगितले की, कोरोंनाच्या काळात आमच्या घराची इलेक्ट्रिक गोडाऊन मुळे राख रंगोळी झाली. होत नव्हते सर्व काही नष्ट झाले. जळलेली घरे व वस्तु अजूनही आज तशाच अवस्थेत पडून आहे. त्यावेळी घरे बांधून देऊ अशी आश्वासणे अनेक नगरसेवक व अधिकारी यांनी आम्हाला केली. मात्र अद्याप कोणी आले नाही. ज्या इलेक्ट्रिकच्या गोडाऊनमुळे घराला आग लागली आहे त्याच गोडाऊनच्या मालकाने आम्हाला भरपाई व घरे बांधून देणे अपेक्षित आहे.

आम्ही वारंवार मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र उलट आम्हाला खोट्या केसेस टाकून अडकविण्याची भीती या मालकाने दाखविली आहे. त्याच्या गोडाऊनचे इन्शुरन्स असल्यामुळे त्यांना भरपाई मिळाली मात्र आम्हाला भरपाई कोण देणार . आम्हाला देखील आमच्या घरात जायचे आहे. मात्र सध्या ती घरे राहण्याच्या परिस्थितीत नाही. घरच्या छापरवर मोठे कुजलेले वडाचे 90 वर्षापूर्वीचे झाड आहे. ते कधीही मोडून पडू शकते. आमची लहान मुले आहेत व जीवितहानी कधीही होऊ शकते. ते झाड काढण्यासाठीही अनेकदा तक्रारी केल्या मात्र याकडे देखील मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. आम्ही सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत.

त्या दुकानाचा मालक झोपडपट्टीधारकांना दमदाटी करत असून, उलटसुलट भाषा वापरत असल्याने कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. मात्र, त्यानंतर पालिका प्रशासनाने पुढील कार्यवाही केली नाही. त्यामुळे येथील नागरिक आता कात्रीत सापडले आहेत. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना संरक्षण मिळण्याऐवजी मलिदा मिळणाऱ्या दुकानदारांना संरक्षण दिले जात आहे, ही बाब निषेधार्ह असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तसेच मनपा गवणी विभागातील उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही कारवाई करण्यासाठी शाळेत गेलो होतो. त्यांची राहते घरे ही प्रायव्हेट जागेत आहे. त्यामुळे मनपा प्रशासन त्यांना घरे बांधून देण्यासाठी बांधिलकी नाही. शाळसुरू करण्याचा अचानक निर्णय झाल्याने आम्ही त्यांना लगेच शाळे बाहेर काढू शकत नाही. त्यांची देखील लहान लहान मुले आहेत. आपणही माणुसकी आपण जपली पाहिजे. सहानभूती म्हणून त्यांना मदत करणार आहे. त्यांच्या घराची दुरुस्ती झाल्यास लवकरात लवकर त्यांचे स्थलांतर करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com