

Sharad Pawar
बारामती - ‘देश आणि राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असून, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. मात्र, मूळ प्रश्नांवर चर्चा होऊ नये म्हणून विविध मुद्दे पुढे आणून सरकारकडून लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे,’ असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला.