Shetkari Aakrosh Morcha : शेतकऱ्यांची भावना समजून घेणे महत्त्वाचे - खासदार डॉ. अमोल कोल्हे

शेतकरी आक्रोश मोर्चा शनिवारी (ता. ३०) पूर्व हवेलीतील शिंदवणे, उरुळी कांचन, सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी, थेऊर फाटा लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या ठिकाणी काढण्यात आला.
Shetkari Aakrosh Morcha Mp Dr. Amol Kolhe
Shetkari Aakrosh Morcha Mp Dr. Amol Kolhesakal

उरुळी कांचन - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे कोणीतरी आले आहे हा भावनेने शेतकरी वर्ग आनंदित आहे. एका ही नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतलेली नाही. भारत हा कृषिप्रधान देश आहे पण दुर्दैव असं की देशाला कृषी मंत्री नाही. केंद्र सरकारच्या काही चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याशिवाय महागाई, महिलांची सुरक्षितता, बेरोजगार, याकडे ही कोणाचेच लक्ष नसल्याची खंत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

शेतकरी आक्रोश मोर्चा शनिवारी (ता. ३०) पूर्व हवेलीतील शिंदवणे, उरुळी कांचन, सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी, थेऊर फाटा लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या ठिकाणी काढण्यात आला होता. त्यावेळी कोल्हे बोलत होते. पूर्व हवेलीतील शिंदवणे ते उरुळी कांचन (ता. हवेली) एलाइट चौक पर्यंत बैलगाडीतून शेतकरी आक्रोश मोर्चा ची सुरवात करण्यात आली.

यावेळी खासदार कोल्हे यांनी उरुळी कांचन येथे अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला कांद्याचे हार घालण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्याच्या राजकारणावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, की पूर्वी सर्वसामान्यांचा राजकारणावर विश्वास नव्हता आणि आता परिस्थिती अशी आहे की राजकारण्यांवर विश्वास राहिला नाही. व्यक्तीसाठी की त्या पक्षाच्या विचारधारेला मतदान करायचे हे व्यक्तीला ठरवावे लागणार आहे. ईडी, सीबीआय कडून राजकीय नेत्यांची कुंडली पाहावी लागेल. आणि त्या कुंडलीत राहू, केतू संकट असेल तर त्यांना पक्षांतर करावं असं मतदाराचे म्हणेण आहे.

पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, की कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी व कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे. तसेच खासगी व शासकीय असा भेद न करता उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून बिबटप्रणव तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात, यासाठी राज्यव्यापी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com