Shivajirao Adhalrao : शिरूर लोकसभा निवडणुकीबद्दल शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मोठे वक्तव्य...

राष्ट्रवादी काँग्रेसला मी जर उमेदवार मान्य असेल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्यास.
Shivajirao Adhalrao
Shivajirao Adhalraosakal

मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघाचे गेली पाच वर्ष मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निवडून आलेला माणूस फिरत नाही. जनतेची कामे करत नाही. पण दादा तुम्ही सतत संपर्क ठेवून जनतेची कामे करत आहात. अशा परिस्थितीत चुकीच्या माणसाला निवडून देण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीत तुम्ही शिरूर मधून निवडणूक लढवा.

असा एक मुखीआग्रह कार्यकर्त्यांनी धरल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला मी जर उमेदवार मान्य असेल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवणार आहे.' असे मोठे वक्तव्य शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. त्यामुळे आढळराव पाटील निवडणूक मैदानात उतरणारच अशी चर्चा मतदारसंघात जोरदार पणे सुरू झाली आहे.

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, अरुण गिरे, रवींद्र करंजखेले सुनील बाणखेले, प्रकाश वाडेकर, संतोष डोके, सचिन बांगर, प्रवीण थोरात, सचिन काजळे, विजय आढारी, बापूसाहेब शिंदे उपस्थित होते

कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बुधवारी रात्री चर्चा झाली. त्यानुसार अजून शिरूरचे जागावाटप झाले नाही. चार-पाच दिवसात याबाबतचा निर्णय होईल. पण शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले होते. त्यांनी सर्वाधिक आमदार व ग्रामपंचायतची संख्या आमच्याकडे असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे कदाचित ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊ शकते. किंवा शिवसेनेकडे राहू शकते.

शिवसेनेकडे राहिल्यानंतर प्रश्नच उरत नाही पण जर राष्ट्रवादीकडे गेली तर त्यांचा निर्णय असेल उमेदवारी कोणाला द्यायची. जर राष्ट्रवादीकडून विचारणा झाली किंवा महायुतीकडून विचारणा झाली तर याबाबत काय करावे .याविषयी आज कार्यकर्त्यांची मते मी जाणून घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनीएकमुखाने सांगितले की मुख्यमंत्री व तुम्ही जो निर्णय घ्याल. तो आम्हाला मान्य राहील. पण निवडणूक लढवाच.

शिरूरच्या उमेदवारीबाबत तुम्ही वळसे पाटील व अजित पवार यांना भेटला होता का? या प्रश्नावर उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले', विकास कामांविषयी व शिरूर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात माझी भेट व चर्चा झालेली आहे .

खेड तालुक्याचेआमदार दिलीप मोहिते यांनी तुमच्या उमेदवारीला विरोध केला आहे. यासंदर्भात आढळराव पाटील म्हणाले, 'या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. मोहिते यांच्या समावेत यापूर्वीही संपर्क व चर्चा झालेली आहे .मी त्यांना कोणतीही हानी पोहोचवलेली नाही.पुन्हा चर्चा करून जर त्यांच्या मनात गैरसमज असतील तर ते दूर केले जातील.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणतात, शिरूर मध्ये माझ्या विरोधात महायुतीलाउमेदवारच मिळत नाही. यासंदर्भात आढळराव पाटील म्हणाले 'ते काही पण बोलतात. त्यांच्या बोलण्याला कुठलाच आधार नसतो.'

दरम्यान एकंदरीत कार्यकर्त्यांचा सूर व आढळराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात आढळराव पाटील उतरणारच अशी जोरदार चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com