पुणे - पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपचे अनेक नेते सध्या पुण्यात येत आहेत. त्यातच आज मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यात येऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर आणि खासकरून शिवसेनेवर हल्लाबोल केला.
महाजन शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की, शिवसेनेची हालत खूप खराब झाली आहे. शिवसेना आता संपली आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत त्यांना जावे लागत आहे. परवा मोदी बोहरी समाजाला भेटले, तेव्हा त्यांनी बोहरी समजावार टीका केली. मात्र काल बोहरी समाजाची भेट घेतली. आता कितीही फिरले तरी त्यांना यश येणार नाही, असा दावा महाजन यांनी केली.
दरम्यान मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना संपत चालली आहे. शिवसेना जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत स्वतः गेली तेव्हाच त्यांनी आत्महत्या केल्याचं महाजन यांनी म्हटलं.
कसबा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, गिरीश बापट हे माझे जवळचे मित्र आहेत. ८-१० वेळा मी त्यांना भेटलो होतो. निश्चितपणे आज निवडणुकीबद्दल चर्चा झाली. उद्या ते एक पत्र काढतील. भाजप उमेदवार विजयी व्हावा ही त्यांची इच्छा आहेच. तसेच टिळक कुटुंबीय, बापट कुटुंबीय आमच्या सोबत आहेत कोणीही नाराज नाही, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी महाजन यांनी सकाळच्या शपथविधीवरही विधान केलं. महाजन म्हणाले की, पहाटेच्या शपथ विधी वेळेस मी तिथे होतो. मी, देवेंद्रजी, अजितदादा तिथे होतो. तिथे काय झालं काय नाही याची मला कल्पना आहे. देवेंद्रजी बोलल्यानंतर ते सुसंस्कृत नाही असं म्हणणे किती योग्य आहे. तुम्ही ही आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा टोलाही महाजन यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला. आपण जे केलं ते सुसंस्कृतपणा होता का?त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असही महाजन यांनी म्हटलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.