समाजसेवा व्यक्तिसापेक्ष नसावी - डॉ. विकास आमटे

समाजसेवा व्यक्तिसापेक्ष नसावी - डॉ. विकास आमटे

पुणे - समाजहिताचे काम उभारायचे असेल, तर समाजसेवा व्यक्तिसापेक्ष असता कामा नये. व्यक्ती, समूह आणि क्षेत्र या घटकांचा विकास यावर भर देण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन डॉ. विकास आमटे यांनी केले.

विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित ‘आनंदवनाचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन यशदा येथे आयोजिलेल्या सहाव्या ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’मध्ये झाले. त्या वेळी आमटे बोलत होते. आनंदवनाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘आनंदवन येथे जवळपास ११ लाख कुष्ठरोग्यांना आधार दिला आहे. आनंदवन हे एक कुटुंब आहे. इथल्या कोणालाही जातपात नाही की धर्मही नाही. आनंदवन हे खऱ्या अर्थाने स्मार्ट व्हिलेज आहे.’’

डॉ. शीतल आमटे म्हणाल्या, ‘‘वैद्यकीय व्यवसायाच्या पलीकडे जाऊन लोकांचे प्रश्न जाणून त्यांना मदत करणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हे आनंदवनाचे महत्त्वपूर्ण काम आहे.’’ 

या वेळी डॉ. पुरंदरे यांनी पुस्तक लेखनामागील भावना मांडल्या. डॉ. मंदार परांजपे यांनी डॉ. विकास व शीतल आमटे यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी भरत अगरवाल, संपादक मनोहर सोनावणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com