Maharashtra Board Exam 2022 : विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही ‘परीक्षा’

बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत संभ्रम कायम
SSC HSC Board exam
SSC HSC Board exam

पुणे: ‘‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या एक वर्षापासून विद्यार्थी घरात बसून अभ्यास करत आहेत. साहजिकच आई म्हणून त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत आहे. आता राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या निर्णयामुळे ‘त्यांची परीक्षा होणार नाही, मग आमची होणार!’ असे प्रश्न मुलगा विचारू लागलायं. त्याला परीक्षेचे महत्त्व, केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन होणे का गरजेचे आहे, हे समजवावे लागतयं’’, असा अनुभव सांगत गृहिणी असलेल्या सुनैना थोरात यांनी बोर्डाच्या परीक्षेबाबत चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. त्यापाठोपाठ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द आणि बारावीच्या परीक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे बुधवारी स्पष्ट केले. यानंतर मात्र दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गोंधळ आणखीच वाढला. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द आणि राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, या निर्णयामुळे पुढील शैक्षणिक वर्षात अकरावी, पदविका अभ्यासक्रम, आयटीआय अशा विविध प्रवेश प्रक्रिया कोणत्या आधारावर राबविल्या जातील. तर बारावीबाबत सीबीएसईचा निर्णय अजूनही होणार असला तरी, आभियांत्रिकी, वैद्यकीय त्याशिवाय विविध पदवी, पदविका अशा अभ्यासक्रमाची गुणवत्तेवर आधारित होणारी प्रवेश प्रक्रिया कशी होणार?, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उपस्थित होत आहेत.

थोरात म्हणाल्या, ‘‘दहावी-बारावीच्या परीक्षा होणे महत्त्वाचे आहे. बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व आम्ही जाणतो. परंतु एकीकडे परीक्षाला पाठवायचे, तर कोरोनाचा संसर्ग झाला तर याचे टेन्शन सतत राहणार, तर दुसरीकडे परीक्षा नाही झाली, तर मुलांचा अभ्यास, ते किती शिकले हे कळणार कसे, असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या सगळेच पालक आणि विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत आहेत.’’

SSC HSC Board exam
रेमडेसिव्हिर हवंय? ऑर्डर नोंदवण्याचं रुग्णालयांना आवाहन

''बोर्डाच्या परीक्षेची ८० टक्के तयारी झाली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत परीक्षा रद्द करू नये. कारण त्यातूनच आपला किती अभ्यास झाला आहे, हे कळणार आहे. त्यामुळे परीक्षा घेणे किंवा अन्य काटेकोर पद्धतीने मूल्यमापन होणे गरजेचे आहे. दहावी-बारावी हा पुढील शिक्षणाचा पाया आहे, तो भक्कम होणे आवश्यक आहे.’’

- ज्ञानेश्वर नागरगोजे, विद्यार्थी, बारावी, विज्ञान शाखा

''बोर्डाच्या परीक्षा घ्यायला हव्यात. तसेच वर्षभर विद्यार्थी ऑनलाइनद्वारे शिक्षण घेत आहेत. त्यातून त्यांना किती कळाले, हे देखील समजणे गरजेचे आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेवर मुलांचे पुढील शिक्षण अवलंबून आहे. परंतु सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, तर राज्य मंडळाने त्या पुढे ढकलल्या. अशात दहावीनंतर अकरावीचे प्रवेश कसे होणार, हे पाहायला हवे. बोर्डाने तसेच सरकारने याचा विचार करून निर्णय घ्यावा.''

- नरेश गोफणे, पालक

SSC HSC Board exam
कोरोनाबाधित कुटुंबाची हतबलता; रेमडेसिव्हिर आणणार कोण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com